Skip to main content

Posts

Featured

वैराटगड आणि प्रवास (भाग २ )

  वैराटगड आणि प्रवास   (भाग २ ) १० ऑक्टोबर २०२३ किमान अडीच तास हळूहळू मार्गक्रमण करत, सह्याद्रीच्या वाटा तुडवत संपूर्ण चमू घडाच्या मुख्य द्वारापाशी पोहोचला. तिथं पोहोचेपर्यंत नव्वद टक्के लोकांच पिण्याचं पाणी संपलं होतं. प्रत्येकाने किमान दोन बाटल्या पाणी आणलं होतं पण गर्मी, ऊन आणि अशी सरळ चढाई यामुळे शरीर थकते आणि तहान लागल्याने पाणी पिणे अनिवार्य होते. मुख्य द्वारापाशी थोडा विसावा घेतला आणि स्थानिक मंडळीनी अडचण ओळखली. त्यांनी सर्वाना सावलीत बसवून सगळ्या बाटल्या गोळा करत काही मुलांना घेऊन पश्चिमेकडे घेऊन गेले. तिकडे किमान चार ते पाच पाण्याचे टाके आहेत आणि त्यात पिण्यायोग्य पाणी असते हे त्यांना ठावूक होते. मी स्वत: सोबत गेलो. गडाच्या कडेकपारीतून थेंब थेंब टीपकणारे पाणी त्या टाक्यात जमा होत होते. तटाक्यातले पाणी अगदी थंड होते आणि स्वच्छ होते. मुलांनी जवळजवळ पन्नास बाटल्या भरून घेतल्या.   तिथे गडावर वास्तवास असणारी काही गगनगिरी भक्त हेच पाणी वापरत असल्याने ते खात्रीशीर होते हे नक्की. मग त्या थंड पाण्याने नवे चैतन्य भरले आणी पुन्हा घोषणा देत गडावर फेरफटका मारला. गडावर एक प्राचीन मंदिर

Latest posts

वैराटगड आणि प्रवास (भाग १ )

एक अलग ही अनुभूती दे गया हैं शहर बनारस

पाढा अनुत्तरीत प्रश्नांचा (भाग १ ) २४ नोव्हेंबर २०२२

जागतिक पुस्तक दिवस आणि शेक्सपियर दिवस

वाढदिवस विशेष तृप्ती

तृषार्त पथिक भाग १ ( २०/३/२१ )

लेखाजोखा २०२० (भाग ३)

लेखाजोखा २०२० (भाग २)

लेखाजोखा वर्ष २०२० (भाग १ )

थंडी आणि अलार्म २८/११/२०२०