विचारमंथन १/१०/१८

विचारमंथन १/१०/१८
पेपरात काल परवा
एक सुविचार वाचला मी
म्हणे ' काम कोणतेही असो 
समाधान महत्वाचे कामातले '
काम कुठंय या हातांना?
माझ्या देशातील तरुणांना?
एक पंचविशीतील तरुण चक्क ओला चालवत होता.
त्याने प्रवासात व्यथा प्रकट केली की तो पदव्युत्तर झालाय
आणि गरिबीने नेहमीप्रमाणे पिढीच्या पिढी बरबाद केलीय त्याची
कष्ट आणि फक्त कष्ट आहेत म्हणे वाट्याला त्याच्या आणि त्या कुटुंबाच्या
त्याला विचारले की नोकरी का नाही करत एखादी?
तो फक्त हसला आणि
उत्तरला,'सर, आहेत का नोकऱ्या?
रिक्षा का चालवली असती मी या वयात?
उतरतांना हे देखील म्हणाला तो कि वाढतो तेलाचे भाव आमचा नफा कमी करतो
बहुदा मी हे मीदेखील काम सोडेन कारण दिवसभर रिक्षा चालवून खिसा रिकामा राहतोय.
त्याची व्यथित झालेली अवस्था
त्याच्या मनातल्या भावना दाट होत्या
इथे सरकार किंवा व्यवस्था यांना दोष द्यावा
की थेट त्याला काही येत नसावे आणि मोकळे व्हावे
या विवंचनेतून फार काही साध्य होईल का असे वाटते.
तो त्याची उमेदीची वर्षे, उमेदीचा काळ असा असा जाईल
असे स्वप्नातही पाहू इच्छित नसेल पण हे कठोर सत्य आहे हे नक्की.
इथे मनाने
आतील बुद्धीने
आतील संवेदनेने
आतल्या हुंकाराने
यक्षप्रश्न उभा केला
ऐन विशीतील
ऐन तरुण अवस्था
ऐन उमेदीची वर्षे ही
अनंत पाहिलेली स्वप्ने आणि
त्यातील फोलपणा पचवणं हे
एक मोठे दिव्यच वाटत आहे.
वित्तार्जन आणि भौतिक गरजा
या एवढ्या व्यापून टाकतात मानवास
की त्याची घड्याळी कसरत होते यासाठी
फक्त आणि फक्त तो गुरफटतो काही छदाम
काही कागदी नोटा आणि बँकेतील काही सेविंग
आणि थोडेफार आरामदेही जीवन जगण्यासाठी, हो ना?
अर्थात व्याख्या करावी का सुखाची त्याने
ज्याला किमान आज भौतिक साधने देखील
दुष्कर, दुर्लभ आणि महागडी झालेली आहेत.
किमान गरजा भागवून जगणे त्याला शिकावं लागेल
पण का शिकावं त्यानं ते हे देखील विचारलं पाहिजे हो.
का कोणी स्वप्नं पाहू नये? का कोणी मग उंच उंच उडू नये?
पण उडायला हवे बळ ते हि पंखात, ते नसावेत पार छाटलेले
कमकुवत अर्थव्यवस्थेने, मूलभूत गरजेने आणि नेहमीच्या हलाखीने.
--- सचिन गाडेकर

Comments